Saturday, October 30, 2010

व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ते स्वत: आहेत आणि नाहीतही. त्यांचे प्रत्येक पात्र निवेदनात आपला रास्त हिस्सा घेते, आपली बाजू मांडते. न्यायाधीशाशिवाय चाललेले हे खटले आहेत. परस्परविरोधी दावे करणारे आणि स्वत:ची वकिली करणारे लोक, आरोप करणारे, अपराध करणारे, साक्ष देणारे, निकाल देणारे असे अनेक निवेदकांचे स्वर भाऊंच्या लेखनात आपल्याला ऐकू येतात. मग कळते की हा एक समाजाचा गलबला आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे.
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे


आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं ह्याबद्दल आम्ही अडाणी राह्यलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही. 'कधीकाळी कुठंतरी माझा समानधर्मा निपजेल' ही प्रत्येकच लिहिणा-याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागं ठेवून गेलाय का नाही कोण जाणे!
(महाराष्ट्र टाइम्स, ३ नोव्हेंबर १९९६)


The new literature (that began in 1960s) dedicated itself to looking at life with the naked eye and recording what it saw in ruthless detail. Bhau Padhye took the short story out of its cosy, middle-class environs onto the streets, gutters and public parks of the big city where loafers and layabouts, clerks and coolies, struggled to survive. Padhye's language too was of the streets, paying no heed to the niceties that had, until then, separated literature from life. Conservatives rose up in arms against him, but the young recognised their world in his.
- Shanta Gokhale
(The Hindu, 7 March 2010 )


Every great city creates its own great writer and Bhau Padhye — the Marathi fiction-writer— was created by Bombay. I consider him the greatest writer of Bombay in any language.
- Dilip Chitre
(Tehelka, 02 July 2005)


पात्रचित्रणाच्या तंत्रात 'नमुने' हे वास्तववादी साहित्याचे लक्षण आणि घटक समजले गेले आहेत (लुकाच). ह्या नमुन्यांत व्यक्तीचे सामान्यत्व व विशेषत्व हे दोन्ही गुण असावे लागतात, दोन्हीचा संयोग व्हावा लागतो. मराठीतल्या व्यक्तिप्रधान कादंब-यांत, विशेषत: लैंगिकता हेच आशयसूत्र असलेल्या कादंब-यांत, वास्तवाभिमुख असा हा संयोग घडत नाही. ह्याशिवाय नव्या समाजात भावनिक व बौद्धिक अशा दोन्ही वृत्ती माणसांमध्ये सापडतात. पात्रे विचार करणारीही असावी लागतात. नुसती भोगणारी, भोग देणारी, असहाय अशी नसतात. वेश्या झालेली स्त्रीही आधीची एक असह्य चौकट मोडून वेश्या होते, ही वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. ह्या बाबतीत भाऊ पाध्ये यांची पात्रे ठळकपणे समोर येतात (अग्रेसर, वैतागवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, वासूनाका). म्हणून भाऊ पाध्ये आजचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत असे मानावे लागते.
- भालचंद्र नेमाडे
(टीकास्वयंवर, पान २२८)



  
ज्यांना भाऊंच्या ह्या दस्तावेजाविषयी इतरांना सांगायचंय त्यांना हे पत्रक ई-मेलने पाठवता येईल, किंवा प्रिंट काढून नोटीस बोर्डावर लावता येईल, किंवा नुसतं वाटता येईल.
***

5 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. This post will interest you

    http://daywalker-dreambeats.blogspot.com/2010/11/reincarnation-of-bhau-padhye-writer.html

    ReplyDelete
  3. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252928:2012-09-30-18-01-30&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408

    ReplyDelete
  4. Bhau Padhye's fantastic article on Shivsena supremo Bal Thackeray-

    http://ekregh.blogspot.in/2012/10/blog-post_30.html

    ReplyDelete
  5. This is interesting. Following is the comment on an article about Rada on maayboli.com - http://www.maayboli.com/node/36110.
    As mentioned on the site, the comment is by Mr. Ashok Patil.


    अशोक. | 5 July, 2012 - 01:51



    मी आणि माझे मित्र ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळी नेमाडे, शहाणे, दंडवते आणि अर्थातच भाऊ पाध्ये यानी आमच्या पिढीला वेडे केले होते, म्हणजे फडके खांडेकर सबकुछ झूठ असे वाटणारा तो काळ होता आणि जरी नेमाडे 'कोसला' नंतर बरीच वर्षे खर्‍या अर्थाने कोसल्यात गेले, तरी भाऊ पाध्येंच्या एकापेक्षा एक सरस अशा कादंबर्‍यांनी आणि कथांनीही पिढीची मोहिनी उतरविली नाही.

    तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल पण मी खुद्द भाऊ पाध्ये याना 'वैतागवाडी" आणि 'वासूनाका' वर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठात व्याख्यान देताना ऐकले आहे. चक्क आठवड्याभराचा तो कार्यक्रम होता (थॅन्क्स टु डॉ.गो.म.पवार, त्यावेळेचे मराठी विषयाचे विद्यापीठातील प्रमुख, ज्यांची नेमाड्यांशी अरेतुरेची मैत्री असल्याने भाऊशीही तसेच नाते निर्माण झाले होते) आणि त्यावेळेचा डायसवरील त्यांचा आविर्भाव 'अनिरूद्ध' पेक्षा अगदी 'पोक्या' आणि 'मधू' शी साम्य दर्शविणारा, तेही त्यावेळेच्या ऑडियन्सला भावले होते. तसे पाहिले तर पाध्ये यांचे नायक कधीच 'सुपर' वाटणार नाही अशी त्यानीच काळजी घेतल्याचे दिसते. प्रत्येक वाचकाला असेच वाटायचे की, अरेच्या हा तर माझ्या शेजारचाच की. अगदी सर्वसामान्यांच्या व्यथा आणि त्यापोटी महानगरात होणारी ससेहोलपट याचेच प्रतिनिधी होते सारे. घराच्या तृष्णेने कासाविस झालेला सोहनीसारखा एक कनिष्ठ कारकून असो, तळागाळांतील कामगारांसाठी झटणारा मधू, होमसिकचे निळूभाऊ असोत, इतकेच काय 'अग्रेसर' वैजू असो....ही सारी पात्रे कधीही 'लार्जर दॅन लाईफ' वाटली नाहीत.

    तुमच्या लेखातील 'मंदार' हा देखील असाच एक तरुण आणि शिवसेनेच्या उदयानंतरचा तो 'राडा' काळ असल्याने त्यातील वर्णन त्यावेळेच्या तमाम तरुणांसाठी एक दिशादिग्दर्शनच ठरले.

    तुम्ही नेमाडे यांच्या 'राडा' प्रस्तावनेचा छान उल्लेख केला आहे. महानगरातील अनेक पात्रे त्यांचे नायक आहेत (विशेषतः वासूनाका गॅन्ग) पण खोलवर त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत गेल्यास भाऊंच्या दृष्टीने 'मुंबई' शहरच त्यांचा खर्‍या अर्थाने नायक होते.

    'बिढार' मधील चांगदेव पाटील मुंबई सोडून अन्यत्र नोकरी करण्यास, जगण्यास बाहेर पडतो तर या शहरावर अतोनात प्रेम करणारे त्याचे झाडून सारे मित्र त्याच्या निर्णयावर टीका करतात. त्यात जसे कवि पु.शि.रेगे होते तसेच भाऊ पाध्येही होतेच, कारण मुंबई शिवाय त्यांच्यातील लेखक जगूच शकत नव्हता.

    ReplyDelete